MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...
ईर्षा नको तर महत्वाकांक्षा पाहिजे...स्पर्धा परीक्षेतून अधिकारी व्हायचे यासाठी स्वतःचे अंतर्बाह्य व्यक्तिमत्व तावून सुलाखून निघाले पाहिजे. आपल्या परिचयातील किंवा भवतालचे कोणीही अधिकारी झाले तर काहीजण मनात ईर्षा बाळगतात आणि आपण किंवा आपली मुल देखील अधिकारी झाली पाहिजेत किंवा मी करून दाखवितो अशी ईर्षा बाळगणे म्हणजे आत्मघात होय. कारण प्रत्येक व्यक्तिमत्व वेगवेगळे असते आणि 'घटा घटाचे रूप आगळे , प्रत्येकाचे दैव वेगळे... 'हेच खरे असते.
त्यामुळे मी अमुकासारखे अधिकारी होऊन दाखवितो ही स्पर्धा करण्यापेक्षा मला आयुष्यात अमूक एक करायचे आहे ही महत्वाकांक्षा बाळगा... त्यासाठी प्रामाणिक कष्ट करा... स्पर्धा परीक्षेचा अभ्यास व अनुभव हा आयुष्याला समृद्ध करीत असतो ... विविध क्षेत्रातील ज्ञानाने आपण संपन्न होत असतो... आणि ज्ञान कधीही व्यर्थ जात नाही... ते कुठेतरी उपयोगीच पडते. आम्ही जास्तीत जास्त मेहनत घेऊन स्पर्धा परीक्षेची वाटचाल करून चांगला रिझल्ट आणण्याचा प्रयत्न करू असा निर्धार करा... इतरांशी बरोबरी , स्पर्धा करण्याचा विचार करू नका.
प्रा. मीता चौधरी
www.rajpathacademy.com
%20F1.jpg)
