Wednesday, June 14, 2023

ऐकावे जनावे करावे मनाचे ... MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...

 MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...

ऐकावे जनावे करावे मनाचे ...
दहावी, बारावीचे निकाल लागले... पुढे करिअरच्या वाटा निवडायच्या आहेत. अनेक ठिकाणी करिअर मेळावे आयोजित केले जातात. अनेक तज्ज्ञ् मार्गदर्शक विविध क्षेत्रांची माहिती देतात.
या दरम्यानच #UPSC चा किंवा #MPSC चा निकाल लागलेला असतो. यशस्वी उमेदवार ही करिअरचे मंत्र विद्यार्थ्यांना सांगतात. आपले परिचयातील, शेजारील, नातेवाईक यापैकी जे UPSC / MPSC ची तयारी करतात. त्यांना थोडा एक-दोन वर्षाचा अनुभव मिळाल्यास ते देखील मार्गदर्शकाच्या भूमिकेत शिरतात... आणि नव विद्यार्थी व पालकांना सल्ला देतात.
अनेकांचे अनेक सल्ले ... कोणाचे ऐकावे ? हाच मोठा प्रश्न ... मात्र आपणच स्वतःला सर्वात चांगले ओळखत असतो ... म्हणूनच #करिअर निवडताना स्पर्धा परीक्षेकडे येणार असाल तर अंतर्मनाचा आवाज ओळखा व स्वतःच्या मनाने अभ्यासपूर्ण निर्णय घ्या...
प्रा. मीता चौधरी

MPSC/UPSC Classes, mpsc group b, mpsc group c

Friday, June 9, 2023

योग्य मार्ग दाखविणारा .... तो गुरु ...

 MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...

     स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करण्याचे ठरविले की क्लास कोणता लावायचा याची शोधाशोध सुरु होते. मात्र स्पर्धा परीक्षेतून यशस्वी होऊन चांगला अधिकारी होण्यासाठी फक्त क्लास नाही तर 'गुरु ' मिळणे आवश्यक आहे. जो योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला यशाचा खडतर मार्ग चालण्यासाठी मदत करेन. तसेच तुम्ही प्रामाणिक, कार्यक्षम, संवेदनशील अधिकारी घडू शकाल यासाठी तुमच्यावर तसे संस्कार करेन.

      स्पर्धा परीक्षेच्या बाजारात व्यावसायिक दृष्टिकोन तर आहेच ... पण हा व्यवसाय फक्त खरेदी - विक्रीचा नाही. तर आपल्या सामाजिक समस्यांवर प्रशासकीय उपाययोजना करण्यासाठी कर्तबगार अधिकारी घडविण्याचा आहे. यासाठी या व्यवसायात मूल्य असणे गरजेची आहेत. ती मूल्ये जपणारा गुरु, मार्गदर्शक, वाटाड्या ... विद्यार्थांना भेटणे आवश्यक आहे.  म्हणून विद्यार्थी व पालकांनी MPSC / UPSC क्लासेस न शोधता मार्गदर्शक गुरूचा शोध घ्यावा.

प्रा. मीता  चौधरी
www.rajpathacademy.com

Tuesday, June 6, 2023

स्पर्धा परीक्षा म्हणजे ... सातत्य, चिकाटी

 MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...

स्पर्धा परीक्षा म्हणजे ... सातत्य, चिकाटी
         
           दहावी, बारावी, अथवा पदवीला तुम्हाला किती गुण मिळाले... तुम्ही शाळेत , कॉलेजमधील स्कॉलर विद्यार्थी  होते काय?... हे मुद्दे  स्पर्धा परीक्षेतील यशासाठी जास्त महत्वाचे नाहीत.  नाहीतर वर्गातील पहिल्या दहा क्रमांकाची सर्वच मुले IAS / IPS अथवा DC, तहसिलदार  झाली असती. मात्र वर्गातील साधारण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळविताना दिसते. कारण त्याला डॉक्टर, इंजिनिअर होण्याच्या स्पर्धेत तग धरता येत नाही. आणि आयुष्यात काहीतरी मिळवायचे तर स्पर्धा परीक्षेतून संधी भरपूर असतात हे विद्यार्थ्यांना वाढत्या वयानुसार समजून येते. स्पर्धा परीक्षेत टिकण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी अभ्यासातील सातत्य , चिकाटी, खडतर मेहनत यामध्ये जो जिंकतो ... त्यास चांगली सरकारी नोकरी नक्कीच मिळते . कितीही चढउतार , संकटे आली तरी निराश न होता स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला चिकटून राहणेच ... यशापर्यत पोहोचण्यास मदत करते... 'महापुरे झाडे (वृक्षे) जाती तेथे लव्हाळे राहाती '... 
प्रा. मीता चौधरी
www.rajpathacademy.com MPSC/UPSC Admissions Open!!! बॅच सुरु : 16 जून 2023
MPSC UPSC Foundation Course For 10th, 12th & College Students



Thursday, June 1, 2023

ईर्षा नको तर महत्वाकांक्षा पाहिजे... MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...

MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...

ईर्षा नको तर महत्वाकांक्षा पाहिजे...

             स्पर्धा परीक्षेतून अधिकारी व्हायचे यासाठी स्वतःचे अंतर्बाह्य व्यक्तिमत्व तावून सुलाखून निघाले पाहिजे. आपल्या परिचयातील किंवा भवतालचे कोणीही अधिकारी झाले तर काहीजण मनात ईर्षा बाळगतात आणि आपण किंवा आपली मुल देखील अधिकारी झाली पाहिजेत किंवा मी करून दाखवितो अशी ईर्षा बाळगणे म्हणजे आत्मघात होय. कारण प्रत्येक व्यक्तिमत्व वेगवेगळे असते आणि 'घटा  घटाचे रूप आगळे , प्रत्येकाचे दैव वेगळे... 'हेच खरे असते.

             त्यामुळे मी अमुकासारखे अधिकारी होऊन दाखवितो ही स्पर्धा करण्यापेक्षा मला आयुष्यात अमूक एक करायचे आहे ही महत्वाकांक्षा बाळगा... त्यासाठी प्रामाणिक कष्ट करा... स्पर्धा परीक्षेचा अभ्यास व अनुभव हा आयुष्याला समृद्ध करीत असतो ... विविध क्षेत्रातील ज्ञानाने आपण संपन्न होत असतो... आणि ज्ञान कधीही व्यर्थ जात नाही... ते कुठेतरी उपयोगीच पडते. आम्ही जास्तीत जास्त मेहनत घेऊन स्पर्धा परीक्षेची वाटचाल करून चांगला रिझल्ट आणण्याचा प्रयत्न करू असा निर्धार करा... इतरांशी बरोबरी , स्पर्धा करण्याचा विचार करू नका.

प्रा. मीता चौधरी
www.rajpathacademy.com