MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...
'स्वतःला ओळखा'...
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास व त्यातील यश ... यासाठी संयम, चिकाटी, सातत्य याची गरज असते. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी सर्वच विषयांचा सखोल अभ्यास करावा लागतो. व्यक्तिमत्त्व विकसित होणे ही बाब देखील आवश्यक आहे. पदवीपर्यंत केलेल्या अभ्यासापेक्षा कैक पटीने जास्त अभ्यास करावा लागतो. त्यासाठी वाचन, लिखाणाची बैठक जमविणे, MPSC/UPSC संदर्भ साहित्य मिळवणे, अनेक वैयक्तिक बाबींना काही काळ तिलांजली देणे, तसेच कौटुंबिक, सामाजिक क्षेत्रापासून अलिप्त ... एकांतात राहून अभ्यास करणे आवश्यक असते. या काळात आर्थिक गोष्टींची जुळवाजुळव ही तर अत्यंत संवेदनशील गोष्ट आहे... या सर्वांमधून मन स्थिर ठेवून तयारी करताना अपयशाचा सामना जास्त व आशेची झुळूक तशी अल्प ... अशी स्थिती असते.
म्हणूनच ही सर्व परिस्थिती पेलण्याची क्षमता, इच्छा, जिद्द आपल्यामध्ये आहे का?... आपला निर्धार पक्का आहे का? स्पर्धा परीक्षेतील चढ उताराशी चिवट झुंज तुम्ही देऊ शकता काय? हे जाणा ... स्वतःला ओळखा ... मग स्पर्धा परीक्षेच्या ज्ञानसागरात स्वतःला झोकून द्या ... फक्त जिकंण्यासाठीच. .. !
धन्यवाद !
प्रा. मीता चौधरी
संस्थापक व प्रमुख
राजपथ अकॅडमी, पुणे
८००७९०९१६०
No comments:
Post a Comment