MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...
अंधानुकरण करू नये...
एक यशस्वी झालेल्याचे कौतुक होते... त्याचेच सर्व ते योग्य ... ती यशस्वी व्यक्ती बोलेन ते प्रमाण, सांगेन ती पूर्व दिशा... असेच आपल्याकडे घडते आणि म्हणून मलाही अधिकारी व्हायचे तर अशाच यशस्वीतांचे सर्व बाबतीत अनुकरण करणे हे अंधानुकरण होय.
पण एक यशस्वी होताना बाकीचे ९९% अयशस्वी झालेल्यांची योग्यता तसूभरही कमी नसते. mpsc/upsc च्या संघर्षात शेवटच्या टप्प्यापर्यत पोहोचलेले सर्वच गुणवान व प्रज्ञावंत असतात... कदाचित काकणभर सरस असतात. फक्त त्यांचे सर्व सूर त्यावेळेस जुळून न आल्याने फक्त त्यांना पोस्ट भेटली नाही; इतकेच आपण म्हणू शकतो. मात्र यांच्याकडूनही कित्येक गोष्टी शिकण्यासारख्या असतात.
UPSC /MPSC च्या निकालानंतर होणाऱ्या वारेमाप मुलाखती, सल्ले, मार्गदर्शन या सर्व गोष्टींना भारावून जाऊन अंधानुकरण करण्यापेक्षा डोळस अनुकरण करावे हेच योग्य.
प्रा.मीता चौधरी
No comments:
Post a Comment